मध्यावधीचे 'रडार'
मध्यावधीचे 'रडार' सध्या पावसाने कृपादृष्टी दाखविली आहे. त्यामुळे, काळे ढग जमा झाले की दररोज पाऊस पडतोय.. नाही म्हणायला राज्यावर देखील मध्यावधी निवडणुकांचे ढग दाटून आल्याची श्यक्यता सत्ताधाऱयांच्या सुंदोपसुंदीतून दिसून येत आहे. दोन तीन वर्षाआधी दुष्काळात पाऊस पाडण्यासाठी रडार यंत्रणेचा आधार घेण्यात आला होता. ढग दाटून आले कि पाऊस पाडण्यासाठी त्या ढगांच्या दिशेने विमानातून बाण सोडावा लागायचा.. सध्या राज्यातही मध्यावधी रडारवर आल्याचे चित्र असून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना इशाऱयांचे अग्निबाण एकेमेकांवर सोडताना दिसत आहेत. काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाण साधत 'राजकीय भूकंप' नावाचा बाण भाजपावर सोडून मध्यावधीच्या ढगांना छेद देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी कुत्रिम पाऊस पाडण्यासाठी रडार यंत्रणा बसविण्यात आली होती त्याच संत नगरी शेगाव मधून ठाकरेंनी मध्यवधीच्या रडारवर मारा केला. अर्थात, शेगाव येथे रडार यंत्रणा कार्यरत असताना त्यामाध्यामातून कवचितच प्रजन्यधारा बरसल्या होत्या. त्यामुळे, सत्ताप्रिय राजकारणात भूल दिल्याशिवाय 'ऑपेरेश