'बुद्धि' 'बळा' चे राजकारण
बुद्धिबळाप्रमाणेच राजकारण हा बुद्धी, कौशल्य आणि चातुर्याचा खेळ आहे. यातही प्रत्येक चाल विचारपूर्वक आणि प्रतिस्पर्धी काय चाल खेळतोय वा खेळू शकेल, याचा अंदाज बांधून खेळावी लागते. केंव्हा पुढे जायचे, कुठे माघार घ्यायची, कुणाला शह केंव्हा द्यायचा याची टायमिंग ज्याला कळते तो या खेळात यशस्वी होतो. चातुर्य थोडे जरी कमी पडले की फटका हमखास बसतो. याची प्रचिती सध्या बिहारच्या राजकारणात बघायला मिळत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत महागठबंधन तयार केले. मोदी लाट असतानाही अनपेक्षितपणे या गठबंधनाला मोठे यश मिळाले. बिहारमध्ये नितीश लालू च्या जोडीने भाजपाला 'मात' दिल्याने राजकीय 'पटा' वर नीतिशकुमार 'राजा' ठरले. आगामी २०१९ च्या निवडणुकीतील मोदीविरोधातला 'चेहरा' म्हणून त्यांना ' मोहरा' बनविण्याचा प्रयत्न सुरु झाला. मात्र त्यानंतरच्या काळात अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेल्या सोप्या परंतु भेदक चाली लालूप्रसादच काय तर विरोधकही समजू शकले नाही. मोदी- शाह या जोडगळीने आपल्या 'बुद्धि'