तुझा विसर न व्हावा !
पंढरीची वारी' हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. ईश्वरनिष्ठाच्या मांदीयाळीचं असे अनोखे रूप जगात कोठेही पहावयास मिळत नाही. कपाळावर बुक्का, गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ, खांद्यावर पताका आणि मुखाने विठ्ठलनामाची गर्जना करत आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी जाणारा लाखोचा वैष्णव मेळा म्हणजे विठ्ठलभक्तीचा महापूरच. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे पायी वारी रद्द करण्यात आली आहे. आजवर वारीच्या मार्गात अनेक अडचणी आल्या. वादळ, महापूर, दुष्काळ.. साथीच्या रोगाचे थैमानही वारीला रोखू शकले नाही. 'माझ्या जीवीची आवडी | पंढरपुरा नेइन गुढी ||' ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा शेकडो वर्षापासून वारकरी पूर्ण करत राहिले. मात्र, कोरोना नावाचा काळ यावर्षी असा आडवा आला की वारीची परंपरा अडचणीत आली आहे. संपर्कातून कोरोना संक्रमणाचा धोका असल्याने माऊली भक्तांच्या सुरक्षेचा विचार करून राज्य शासनाने पालखी सोहळा कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि शासकीय नियमांनुसार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे, यावेळी पंढरपुरात कोणताही मोठा सोहळा नाही, दिंड्या नाही, चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा जमा होणार