यश तुमचंच आहे..!
यश तुमचंच आहे..! आज बारावीचा निकाल जाहीर होतोय..पुढच्या आठवड्यात दहावीचा आणि त्यानंतर नीट, जेईई, सीईटी आदी परीक्षांचे निकाल जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत. परीक्षेचा काळ जसा तणावाचा तसाच निकालाची वेळी काळजाचे ठोके चुकवणारी असते. हल्ली उच्च शिक्षणासाठी तसेच चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी दहावी बारावीच्या परीक्षेसोबत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित होत असल्याने परीक्षेचा निकाल हा फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर तो पालकांनाही अस्वस्थ करणारा विषय बनला आहे. प्रत्येक सुजाण पालकाला आपल्या मुलांचे चांगले व्हावे असेच वाटत असते. मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होत उच्च श्रेणी पटकवावी, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊन डॉक्टर, इंजिनीयर बनावे, अशी बहुतांश पालकांची मनोकामना असते. त्याची ही अपेक्षा अगदी रास्त आहे. परंतु, काही पालक मुलांना आपल्या स्वप्नपूर्तीचे "साधन" समजतात. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांवर दबाव आणल्या जातो, पाल्याच्या टक्केवारीला प्रतिष्टेचा मुद्दा बनवून त्याची इतरांशी तुलना केल्या जाते. अशात