एकाच माळेचे मनी ?
एकाच माळेचे मनी ? सत्ताधारी भ्रष्टाचारमुक्त असावेत, ही लोकांची आशा खरं तर भाबडी म्हटली पाहिजे. कारण जगातील प्रत्येक व्यवस्था कमी-अधिक प्रमाणात भ्रष्टाचाराला संरक्षण देत असतात. मग याला चीन, जपान, अमेरिका वगैरे देशही अपवाद नाहीत. लोकशाहीत तर भ्रष्टाचाराचे प्रमाण थोडे जास्तच.. कारण लोकांसाठी राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या नियोजनाचे व अंलबजावणीचे अधिकार राज्यकर्ते आणि नोकरशहांकडे असल्याने त् यांच्या संगनमताने भ्रष्टाचाराची एक मोठी साखळी उभी राहण्याची दाट श्यक्यता असते. मात्र तरीही राज्यकर्ते भ्रष्टाचारी नसावेत, असा लोकांचा आग्रह असतो. लोकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन राजकीय पक्ष यालाच आपला प्रचाराचा मुद्दा बनवितात. मात्र सत्ता ही गोष्टच अशी आहे कि ती भल्याभल्याना बदलावून सोडते. भाजापाचेच उदाहरण घेतले तर,२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या अजेंडय़ावर ‘भ्रष्टाचारमुक्त शासन’ हाच प्रमुख मुद्दा होता. आधीच्या आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांच्या कथित ‘भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर रान उठवून भाजपने निवडणुका जिंकल्या. मात्र राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपच्या काह