अब कि बार, 'ठाकरे' सरकार!
अब कि बार, 'ठाकरे' सरकार ! अत्यंत उत्कंठावर्धक आणि थरारक ठरलेल्या महाराष्ट्रातील सत्ता नाट्याची तिसरी घंटा अखेर वाजली आहे. काल मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात एका नव्या पर्वाला सुरवात झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून बनलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा हा प्रयोग महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवणार आहे. साहजिकच तिन्ही पक्षांच्या विचारधारा भिन्न असल्याने त्यांच्यातील वैचारिक मतभेदांची चर्चा प्राधान्याने केल्या जातेय. मात्र, महाविकास आघाडीने कॉमन मिनिमम प्रोग्रॅम जाहीर करुन सरकारच्या कारभाराची दिशा स्पष्ट केली आहे. भारतीय संविधानाची तत्त्वे आणि मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची ग्वाही महाविकास आघाडीतर्फे देण्यात आल्याने अनेक मुद्द्यांवर पडदा पडला आहे. त्यामुळे 'ठाकरे सरकार' राज्याला विकासाच्या नव्या मार्गावर घेऊन जाईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अर्थात, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रचंड खडतर आव्हानांचे शिवधनुष्य पेलावे लागणा