आगीशी खेळ नको..!
आगीशी खेळ नको..! महानगरांमध्ये अग्निकांडाची जशी मालिकाच सुरु झाली आहे. मुंबईतील साकीनाक्यातील भानू फरसाण कारखाना, कमला मिल कंपाउंड, सत्र न्यायालय अशा एकामागून एक घटना समोर येत असून त्यात जीवित आणि मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. आगीच्या घटनांची ही वाढती संख्या निशचितच सर्वांसाठी चिंताजनक आहे. महतवाचे म्हणजे, ह्या आगीच्या घटना अपघाताने घडल्या असल्या तरी त्यामागे मानवी चुका आणि दुर्लक्ष कार णीभूत असल्याचे समोर येत असल्याने सर्वच स्तरावर काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. कुठलीही आगीची घटना घडली कि शॉटसर्किट हा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो. परंतु या आगीच्या कारणांच्या मुळाशी गेले तर अनेकवेळा शॉर्टसर्किट हे केवळ तत्कालीन कारण असून बेपर्वाई, दुर्लक्ष अशा अनेक कारणांच्या एकत्र परिणामामुळे घटना घडल्याचे समोर येते. सुरक्षेच्या साध्या साध्या गोष्टींकडेही दुर्लक्ष केल्यामुळे कमला मिल कम्पाऊंडमध्ये आगीची दुर्घटना घडली असल्याचे आता समोर येत आहे. वेळीच जर सुरक्षेची खबरदारी घेतल्या गेली असती तर कमला मिलची आग रोखता येऊ शकली असती. त्यामुळे अशा दुर्घटनांची जबाबदारी ठरविताना केवळ प्रशास