राजनैतिक विजय
'राजनैतिक विजय' भारताला 'युद्ध' नाही तर 'बुद्ध' हवा असल्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्य संपूर्ण जगाला दिला होता. त्याचसोबत आगळीक करणाऱ्याला 'जश्यास तसे' उत्तर देण्यात येईल असा इशारा देऊन भारत कोणत्याच दबावापुढे झुकणार नसल्याचे जाहीर केले. डोकलाम खोर्यावर दावा सांगत चीन भारतीय सेनादलाशी धक्काबुक्की करण्याच्या पावित्र्यात असताना पंतप्रधानांची ही नरमाईची भूमिका अनेकांना कोड्यात टाकणारी होती. मात्र, चीनच्या आगाऊपणाचा मुत्सद्देगिरीने सामना करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. एका बाजूला चीनच्या सैन्यासमोर भारताचे सेनादल उभे केले तर दुसरीकडे चिनी अधिकारी, चिनी मीडिया डोकलाम प्रकरणी वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असताना भारताकडून कोणतीच आक्षेपाहार्य टीका टिपणी करण्यात आली नाही. माघार ही नाही आणि आगळीकही नाही अशी ठाम भूमिका भारताने अत्यंत संयमीपणाने हा मुदा हातळाला. अखेर चिनी फौजेला शेपूट घालून माघार घ्यावी लागलेली आहे. दोन देशांच्या मुत्सद्दी मंडळींच्या एकत्र बैठकीतून तसा निर्णय घेतला असून डोकलाम प्रकरणी यशस्वी तोडगा