माँ जिजाऊ च्या लेकी असुरक्षित...। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला स्त्री शिक्षण आणि स्त्री समानतेची फार मोठी परंपरा लाभली आहे. स्त्री भ्रूण हत्या असो कि मुलींचा विकास यासाठी राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मुलीना दत्तक घेवून त्यांचा साभाळ करण्यातहि महाराष्ट्राचा नंबर अव्वलस्थानी लागतो.. ' मां नही तो बेटी नही, बेटी नही तो बेटा नही', पहिली बेटी धनाची पेटी, 'मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते घरोघरी' अश्या घोषवाक्यांमधून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्यात नेहमीच प्रोस्त्चान दिले जाते. अलिकडच्या काळात शासनासमवेत अनेक स्वयंसेवी संस्था सक्रीयपणे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी योगदान देताना दिसत आहेत. मात्र तरीही राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात अजूनही घट होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. बीड, जालना,जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, वाशिम, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सरासरीपेक्षा कमी नोंदविला गेला आहे.. कायद्याचा धाक व जनजागृतीचा डोस देवूनही जनमानसात म्हणावे तसे मतपरिवर्तन झाले नसल्याचे मन विषण्ण कर...