Popular posts from this blog
ऐसे कैसे झाले भोंदू?
बोथट बहिष्कारास्त्र ?
चीनने भारताशी लडाख सीमेवर गलवान खोर्यात आगळीक केल्यानंतर संपूर्ण भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटणे सुरू झाले होते. रेल्वेसह अन्य सरकारी आस्थापनांनी याआधी चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द करत तसेच भारताच्या सीमांशी सीमा भिडलेल्या देशांतील परकीय गुंतवणुकीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी पाऊले उचलायला सुरुवात केली. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले तीन करार स्थगित करून महाराष्ट्रानेही या अर्थयुद्धात आपला सहभाग नोंदवला. नागरिकांनीही सरकारला साथ देत #BoycottChina म्हणजेच चिनी वस्तू-उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम सुरु करून चीनवर बहिष्कारास्त्राचा मारा केला. पण, जशा सीमेवरील कलह निवळन्याच्या बातम्या येऊ लागल्या तशी या बहिष्कारास्त्राची धार बोथट होऊ लागल्याची दिसते आहे. दोन दिवसापूर्वी चिनी मालाची होळी करणार्यांच्या भडकलेल्या भावना आता काहीश्या शांत झाल्या.. सोशल मीडियावरील निषेधाचे सूरही बरेच थंडावले दिसत आहेत. इतकेच नाही तर, सरकारी पातळीवरही पुनरविचाराची गुऱ्हाळे सुरू झाल्याचे वृत्त ...

Comments
Post a Comment